Thursday, 17 March 2016

माझ्या शेतकरी मित्रा थांब !!! तु का आत्महत्या करीत आहेस ???



माझ्या शेतकरी मित्रा थांब !!! तु का आत्महत्या करीत आहेस ???


अल्लाह/ईश्वरा च्या नावाने आरंभ करतो,जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे.

माझ्या शेतकरी मित्रा थांब !!!   तु का आत्महत्या करीत आहेस ???

 मित्रांनो
तुम्ही हा लेख का वाचत आहात ???

    काय तुम्हाला आत्महत्या करण्याची इच्छा होत आहे ??? किंवा शेतकरी बंधू का आत्महत्या करतात हे जाणून घ्यायचे आहे ???

        जर तुम्हाला आत्महत्या करण्याची इच्छा होत असेल तर कृपया तसे करू नका,जर आर्थिक अडचण असेल तर नाना पाटेकर यांच्या  "नाम" संस्थेला  संपर्क करा.
         तसेच मला संपर्क करा ८८८८६२१२३० व आत्महत्या का करू नये हे जाणून घ्या

          प्रसिद्ध मराठी सिने कलाकार नाना पाटेकर यांनी एकदा सांगितले मुस्लिम शेतकरी क्वचितच आत्महत्या करतो कारण कुराण मध्ये सांगितले आहे आत्महत्या करणे पाप आहे.
चला आपण आढावा घेवूया .

कुराण हि अल्लाह (ईश्वराची) वाणी आहे

कुराण मध्ये धडा क्र. ४ आयात/श्लोक क्र.२९ व ३० लिहिले आहे - "… स्वत:ला जीवे ठार करू नका. नि:संशय अल्लाह/ईश्वर तुमच्या वर द्या करणारा आहे" आणि जो कोणी असे करेल (आत्महत्या) त्याला आगीत टाकू (मृत्यू नंतर ) आणि हे अल्लाह/ईश्वर करीता फार सोपे आहे.

अर्थात कोणतीही वस्तू प्रथम बनविताना अवघड असते जसे उदाहरणार्थ विमान प्रथम बनविणे खूप अवघड होते पण दुसऱ्यांदा बनविणे सोपे झाले. त्याच प्रमाणे अल्लाह/ईश्वराला मनुष्याला प्रथम निर्मित करणे अवघड असावे परंतु त्याला परत दुसऱ्यांदा निर्मित करणे मुळीच कठीण नाही आणि तो मृत्यूनंतर पुन्हा जीवित करणार आणि जो कोणी आत्महत्या करील त्याला आगीत टाकणार.

अल्लाह/परमेश्वर कुराण मध्ये धडा क्र. १०२ आयत क्र.१९५ म्हणतो "…. आपल्याच हातांनी स्वत:ला हलाखीत टाकू नका.भलाई करीत रहा. नि:संशय अल्लाह/ईश्वर भलाई करणाऱ्यांशी प्रेम राखतो."

तसेच जो कोणी आगीच्या हत्याराने स्वत:ला मारेल त्याला नरकात त्याच हत्याराने (आगीने ) प्रताडीत केले जाईल .
    जो कोणी स्व:ताला दोरीने फाशी देईल तो तसाच लटकत राहील जो पर्यंत नरकात जळत नाही, आणि जो कोणी स्वत:ला लोखंडी हत्याराने मारेल तो तश्याच हत्याराने स्वत:ला नरकात जख्मी करीत राहील,आणि जो कोणी विष पिऊन मरेल तो नरकातही सारखा विष पीत राहील,आणि जो कोणी उंच ठिकाणाहून उडी मारून आत्महत्या करील तो नरकातही  तसाच नेहमीसाठी पडत राहील.

तरी मित्रांनो आत्महत्या हा सर्वात मोठा पाप आहे व मृत्युनंतरही त्या पापाची शिक्षा भोगावी लागेल.

आज जर तुमच्या वर कठीण प्रसंग असेल तर हे लक्षात ठेवा कि अल्लाह/ईश्वर तुमची परीक्षा घेत आहे व कठीण दिवसानंतर नक्कीच चांगेल दिवसही येणार आहेत. तर फक्त धीर सोडू नका आणि आत्महत्याचा मार्ग अवलंबू नका.
 कारण अल्लाह /ईश्वर कुराण मध्ये धडा क्र.९४ आयात/श्लोक क्र. ५ व ६ मध्ये म्हणतो "… तेव्हा निश्चितच काठीनतेसह सहजता आहे. नि:संशय काठीनतेसह सहजता आहे".

 आणि अल्लाह/परमेश्वर निश्चितच सत्य बोलणारा आहे.

नाना पाटेकर यांच्या नाम संस्थेशी संपर्क करा - http://naammh.org/


Mumbai

NAAM Foundation Office
15&16, Ajay shopping centre
T.H.Katariya marg, Matunga (w)
Mumbai 400016
Rajiv Savant – 96-19-933503
Sachin Arote – 98-69-246959
Anant Tirlotkar – 91-67-096455






माझ्याशी संपर्क करा -
डॉ रियाज युसुफखान पठाण

मो. ८८८८६२१२३०

drriazpathan@gmail.com

No comments:

Post a Comment